नेमेचि येतो पावसाळा त्याचबरोबर नेमेचि येते खरीप पिकांच्या हमीभावाची घोषणा. या वर्षी ती घोषणा एकदम वाजत गाजत करण्यात आली. ऐतिहासिक, क्रांतिकारी, इ. विशेषणे लावून. गंमत म्हणजे आपले “कडी निंदा” फेम गृह मंत्री कृषी मंत्रालयाच्या या विषयावर पत्रकार परिषद घेऊन हमीभावाबद्दल बोलत होते आणि बाउल बसलेले निनावी कृषिमंत्री गप्प…
मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली आणि न्यू इंडियाचे पिल्लू बाजारात आले. पण या न्यू इंडियाच्या जुन्या दुखण्यांची आठवण सरकारला उशिरा येत आहे.आता हळू हळू शेती, शिक्षण, रोजगार, इ.बद्दल नवीन जुमले जन्माला घातले जात आहेत. उदा. खरीप हंगामाची पेरणी संपत आल्यावर MSP जाहीर करणे, साखर उद्योगाला पॅकेज जाहीर करणे…
कॅनेडियन भारतभक्त अक्षय कुमारने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून आधीच्या सरकारवर टीका असलेले जुने ट्विट्स डिलीट केले. गंगा उलटी वाहू लागली कि काय असं वाटलं. (गंगा स्वच्छ झाली की नाही हा एक वेगळा संशोधनाचा विषय). त्याच्यावर टीका झाली आणि मग समजले की आधीच्या ट्विट सारखे ट्विट आता करायला लागू…
गाय पाळून रु १० लाखः आणखी एक थाप! संघीय तज्ज्ञांच्या लांबलचक यादीमधील उगवता तारा म्हणजे बिप्लब देब. त्यांचा वैशिष्ट्य म्हणजे ते इतिहासापासून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान अशा सर्वच विषयांचे तज्ज्ञ आहेत. दररोज यातील एक विषय घेऊन पुडी सोडण्यात त्यांचा हातखंडा आहे. तशी त्यांची अनेक तज्ज्ञ मतं प्रसिद्ध आहेत पण…